Wednesday 29 May 2013


               लोकसंघर्ष मोर्चाची भुमिका....
      संघटना म्हटली म्हणजे तीची स्वत:ची वैचारिक भुमिका असते व काहि निर्णायक भुमिका देखील असतात. लोकसंघर्ष मोर्चा गेली वीस वर्ष झाले समाजातल्या विविध समस्यांवर आपली भुमीका स्पष्ट केली आहे त्यातील अगदी महत्वाच्या भुमिकाची हि धावती ओळख.
     1)   देशाचे स्वांतत्र्य व एकता, लोकशाही व धर्मनिरपेक्षता टिकून राहण्यासाठी संघर्ष.
     2)   साम्राज्यवादी जागतिकीकरण नवउदारमतवादी आर्थिक धोरणाविरुध्द संघर्ष आणि समविचारी संघर्षरत संघटनासोबत काम.
     3)    जमीन, पाणी, जंगल तसेच नैसर्गिक संसाधनावरिल जनतेच्या अधिकारंसाठी संघर्ष.
    4)   शेतीवरिल भारतीय शेतकर्‍यांचा प्रत्येक प्रकारच्या अधिकारांसाठी संघर्ष तसेच शेतकर्‍यांच्या पूर्ण कर्जमूक्तीची मागणी.
     5)   जागतिक व्यापार संघटनेद्वारा शेतीवर लादल्या जाणार्‍या अटींचा विरोध व भारत सरकार ने जागतिक व्यापार संघटनेतून बाहेर पडण्याची मागणी.
     6)   सेझ(विशेष आर्थिक क्षेत्र) च्या नावावर शेतकर्‍यांची जमीन बळकावण्याच्या सरकारी धोरणाचा विरोध.
      7)   मोठी धरणे, तसेच विविध शासकिय योजनांमुळे आदिवासीचे होणारे विस्थापनावर      प्रतिबंध तसेच तथाकथित विकासाच्या नावाखाली होणार्‍या विस्थापनाविरोधात आदिवासी बंधुभगिनीना संघटित करणे व न्यायपुर्ण पुर्नवसनसाठी संघर्ष करणे.
        8)   रोजगाराच्या मूलभुत अधिकारासाठी संघर्ष.
        9)   ग्रामीण रोजगार हमी योजने अर्तंगत होणार्‍या घोटळ्याच्या विरोधात संघर्ष व        पूर्ण वर्षभर प्राकृतिक संसाधनावर आधारित काम असणेसाठी मागणी.
10) शिक्षण क्षेत्रातील असमानता संपविणे तसेच समान शिक्षण प्रणाली लागु करणेसाठी मागणी.
11) आरोग्य सुविधा वर (GDPA) मधील 5% खर्च करण्यासाठी मागणी.
12) असंघटीत मजूरांच्या तसेच कामगारांना सामाजिक सुरक्षेची हमीची मागणी. 13)दलित, आदिवासी, अल्पसंख्याक तसेच महिलांवरिल वाढत्या अत्याचार तसेच हल्याचां निषेध.
14 )सांप्रदायिकता, धार्मिक राष्ट्रवादाचा विरोध.

15)उपभोगवादी व बाजारी वृत्तीचा विरोध तसेच लोककला व लोकसंस्कृतीच्या संरक्षणासाठी प्रयत्न.          

No comments:

Post a Comment